शहीद झालेल्या जवानांचे बलिदान विसरणार नाही - किरण रिजीजू
श्रीनगर, दि. 28, ऑगस्ट - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान देश विसरणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी आज येथे केले. या हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात संपूर्ण देश सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. चकमकीत दहशतवादी ठार होत असून आपले जवानही शहीद होत आहेत. मात्र दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणे सुरुच राहिल, असेही ते म्हणाले.
दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. चकमकीत दहशतवादी ठार होत असून आपले जवानही शहीद होत आहेत. मात्र दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणे सुरुच राहिल, असेही ते म्हणाले.