Breaking News

भारत व नेपाळ यांच्यातील संबंध अत्यंत घनिष्ट - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, दि, 25, ऑगस्ट - भारत व नेपाळ हे दोन्ही देश राजनयिक संबंधांचे 70 वे वर्ष साजरे केले जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध हे अत्यंत घनिष्ट आहेत,  असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. भारत व नेपाळ यांच्यात आठ करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. या निमित्त आयोजित दोन्ही  नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान ते बोलत होते.
नेपाळला सर्वतोपरी मदत करण्याचा विश्‍वास व्यक्त करत दोन्ही देशांतील संबंध समृद्ध आहेत. दोन्ही देश मिळून वेगवेगळ्या योजनांवर एकत्रित काम करत आहेत.  पंतप्रधान देउबा यांनी मला नेपाळ दौ-यावर येण्याचे निमंत्रण दिले आहे. या निमित्ताने दोन्ही देशांतील व्यापार वाढीसाठी सहमती झाली आहे, असेही पंतप्रधान मोदी  म्हणाले.