जवान इथापे यांच्यावर मोरघर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
सायगाव, दि. 30 (प्रतिनिधी) : आसाम येथे सेना दलात कार्यरत असणारे मोरघर, ता. जावली येथील जवान संदीप प्रकाश इथापे (वय 35) यांचा आसाममध्ये कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाला. मुळ गावी त्यांचे पार्थिव आल्यानंतर शोककूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संदीप इथापे हे 14 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. दि. 3 मे रोजी सेवा बजावात असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यात ते जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव मोरघर या त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. यावेळी संपूर्ण सायगाव विभागातून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. शासकीय अधिकारी, सैन्य दलातील अधिकारी, राजकीय पदाधिकारी, मोरघर ग्रामस्थ व परिसरातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जवान संदीप इथापे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संदीप इथापे हे 14 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. दि. 3 मे रोजी सेवा बजावात असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यात ते जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव मोरघर या त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. यावेळी संपूर्ण सायगाव विभागातून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. शासकीय अधिकारी, सैन्य दलातील अधिकारी, राजकीय पदाधिकारी, मोरघर ग्रामस्थ व परिसरातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जवान संदीप इथापे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.