Breaking News

पर्यटकांना भंडारदर्‍यात अनोखी पर्वणी

अकोले, दि. 30 - भंडारदरा धरणाच्या मुख्य भींतीच्या व्हॉल्वद्वारे वर्षातून प्रथमच विसर्ग सोडण्यात आला असल्याने धरणाच्या पायथ्याशी असणार्‍या बगीचा परीसरात वातानुकुलीत वातावरन रनरनत्या उन्हात पर्यटकांना आकर्षीत करत असुन पर्वण ठरत आहे.
राज्यभरात सद्य परिस्थीतीत सुर्य आग ओकत असुन काही जिल्यामध्ये तर उष्णतेने कहर केल्या कारणाने उन्हाचा पारा 45 डीग्री सेल्सीयसपर्यंत पोहचला आहे. मात्र घनदाट जंगल व निसर्ग सौंदर्यांचे वरदान लाभलेल्या भंडारदरा धरण परीसरांत मात्र वातानुकुलीत गारवा आहे. कारण गेल्या 80 दिवसांपासुन विद्युतगृह क्र. 1 द्वारे सोडण्यात आलेला विसर्ग बंद झाल्याकारणाने धरणाच्या मुख्य भींतीच्या व्हॉल्वद्वारे 621 क्यूसेक्स व वायपीसद्वारे 394 क्यूसेक्सने सांयकाळी 6 वाजता विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तो निळवंडे धरणात जमा होणार आहे. विसर्ग किमान 8 ते 10 दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे. विसर्ग सोडतेवेळी धरणात 2321 दलघफु ईतका पाणीसाठा शिल्लक होता.
भंडारदरा धरणातून सुरु असलेल्या विसर्गासाठी साधारन 600 दलघफु पाणी खर्ची होवुन 1600 ते 1700 दललफु पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे रनरनत्या उन्हाळायात देखील प्रचंड गारवा धबधब्याचे मनमोहक सौंदर्य भंडारदरा परीसरात सुद्धा सुरू असलेल्या काजवा महोत्सवसाठी येणार्‍या काजवाप्रेमी पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे.
यासाठी पर्यटक सुटट्या काढून हे नैसर्गिक पर्वणी, दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली पहावयास मिळत आहे. तर केवळ पावसाळ्यामध्येच दिसणारे धबधबे उन्हाळ्यात पहावयास मिळत असुन सोबत काजवा महोत्सव असा दुग्धशर्करा योग असल्याने पर्यटक मनमुराद आस्वाद घेत आहे.