Breaking News

भारत-पाक सामना म्हणजे ‘हिरो’ बनण्याची संधी : अझर महमूद

कराची, दि. 24 - भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान होणारा प्रत्येक सामना म्हणजे हिरो बनण्याची संधी असते. त्यामुळे 4 जूनला होणा-या सामन्यात  पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंना चमक दाखवण्याची संधी आहे, असे मत पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक अझर महमूद याने व्यक्त केले आहे.
भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्याची सारेच जण वाट पाहत असतात. खेळाडू अनुभवी असो किंवा नवोदित असो, हे सामने एखाद्या क्रिकेटपटूला आपली चमक  दाखवण्याची योग्य संधी देतात. ज्यावेळी मी भारताविरूद्ध पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलो, तेव्हा मला माहित होते की या सामन्यात मी चांगली  कामगिरी केली तर माझ्या कामगिरीची कायम नोंद ठेवली जाईल, असे अझरने नमूद केले. भारत-पाक सामन्यात एकही क्षण कंटाळवाणा नसतो. जो संघ सामन्यात  शेवटपर्यंत दडपणाचा सामना करू शकतो, तोच संघ विजयी होतो. आणि अशा दडपणाच्या वेळी एखादा खेळाडू त्याच्या कामगिरीमुळे हिरो बनून जातो, असेही अझर  म्हणाला.