Breaking News

शब्दगंध हे वंचितांचे हक्काचे विचारपीठ

अहमदनगर, दि. 28 - शब्दगंध साहित्यिक परिषद व शब्दगंध साहित्य संमेलन हे राज्यातील ग्रामिण भागातील वंचित साहित्यिक व कलावंताना व्यक्त होण्यासाठी प्राधान्य क्रमाने संधी देणारे हक्काचे विचारपीठ आहे, प्रतिपादन 12 व्या राज्यस्तरी शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक शिंदे यांनी केले. 
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्यावतीने शनिशिंगणापूर येथे घेण्यात आलेल्या 12 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन व राज्यस्तरीय शब्दगंध प्रबोधन पूरस्कार वितरण संमारभात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. सावेडीतील कोहिनुर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्य शिवाजीराव देवढे, कवी चंद्रकांत पावले, लेखिका प्रा. मेघाताई काळे, साहित्यिक डॉ.संजय कळमकर, अ‍ॅड. कॉ.सुभाष लांडे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ.अशोक शिंदे पुढे म्हणाले, ज्या नेवासा तालुक्यात माझा जन्म, शिक्षण व 38 वर्षे सेवा झाली त्याच तालुक्यात शनिशिंगणापुर येथे झालेल्या 12 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविण्याची संधी मला मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे. शब्दगंधचे हे ऋण मी कधीही विसरणार नाही.
प्राचार्य शिवाजीराव देवढे म्हणाले, शब्दगंध ने आपल्या साहित्यिक वाटचालीचे एक तप पुर्ण केले आहे. या 12 वर्षाच्या वाटचाली अनेक अडचणीकर मात करुन शब्दगंध साहित्यिक चळवळ राज्यात विस्तारली. रांगेत नसलेल्या अनेक नवोदित साहित्यिक व कलावंताना शब्दगंधने संधी दिली. व राज्यात त्यांची नवी ओळख निर्माण केली.  सुनिल गोसावी यांनी प्रास्तविक केले. शर्मिला गोसावी यांनी सुत्रसंचलन केले. भगवान राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमास पांडव पुरी, शिरिष जाधव, कृष्णकांत लोणे, विनायक पवळे, ऋता ठाकूर प्रा.तु.द.गोंदकर, प्रा.प्रशांत म्हस्के, हर्षल आगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बबनराव गिरी, भारत गाडेकर, ऋषिकेश राऊत, भाग्यश्री राऊत, दिशा गोसावी, हर्षाली गिरी, आदींनी परिश्रम घेतले.