Breaking News

पंतप्रधान मोदी यांनी पाहिलेले स्वप्न साकारण्यासाठी बालचमुंचा पुढाकार

अहमदनगर, दि. 04 - नववर्षाची सुरुवात प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने केली. कोणी नवे संकल्प केले, तर कोणी नववर्षाचे स्वागत करून सरत्या वर्षाला निरोप  दिला. मात्र, बालचमूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न साकारण्यासाठी पुढाकार घेत सिद्धीबाग व मध्यवर्ती बसस्थानक परिसराची स्वच्छता केली.
मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रत्येकाने स्वतःसाठी जरी स्वच्छता केली, तरी ही अस्वच्छता दूर होऊ शकेल, असा संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व या  विद्यार्थ्यांनी उपस्थितांना पटवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान  राबविताना काही ठिकाणी फक्त फोटोसाठीच राबविले गेले असल्याचे दिसून आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्वयंस्फूर्तीने  पियुष काशिद, सोहम रसाळ, सम्यक मुनोत, देवांष झंवर, श्रीवर्धन रसाळ, माधुरी शिर्के, सार्थक मुनोत,  नामदेव खर्डे, सानिका गोंगे, साक्षी गोंगे, दीप शिर्के या बालचमूंनी सिद्धीबाग, तसेच मध्यवर्ती बसस्थानकाची स्वच्छता केली. ज्या ठिकाणी स्वच्छता केली जाते,  त्याच ठिकाणी काही वेळात पुन्हा कचरा साठतो. ही चित्र बदलण्यासाठी प्रत्येकाने आता या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हायला हवे. या मुलांना सेंट  मायकलच्या प्राचार्या डिसुझा यांचे प्रोत्साहन मिळाले. सिद्धीबागेत फिरण्यासाठी आलेल्यांनी तेथेच कागदे व इतर कचरा फेकून दिला होता. हा कचरा या मुलांनी  उचलून बागेची स्वच्छता केली, तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तर घाणीचा कळसच झाला होता.