मंत्रिमंडळ बैठकीतून शिवसेना वॉकआऊट
मुंबई, दि. 03 - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून शिवसेनेने वॉकआऊट केला. शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना यवतमाळच्या पालकमंत्रीपदावरुन हटवल्याने, शिवसेना नाराज आहे. शिवसेनेशी चर्चा न करता मुख्यमंत्र्यांनी परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्या नाराजीतूनच शिवसेनेने आज मंत्रिमंडळ बैठकीतून काढता पाय घेतला.
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलं आहे. मात्र त्यांना यवतमाळच्या पालकमंत्रीपदावरुन का काढलं? असा सवाल करत, त्यांना पुन्हा यवतमाळचं पालकमंत्रीपद द्यावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलं आहे. मात्र त्यांना यवतमाळच्या पालकमंत्रीपदावरुन का काढलं? असा सवाल करत, त्यांना पुन्हा यवतमाळचं पालकमंत्रीपद द्यावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.