Breaking News

शेतीपूरक योजनांमध्ये महाराष्ट्र अव्वल, उद्योगात दहाव्या स्थानी

मुंबई, दि. 02 - नीती आयोगाच्या वार्षिक अहवालात शेतीपूरक योजनांच्या पुढाकारात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. असे असले तरी उद्योगात मात्र महाराष्ट्र दहाव्या क्रमाकावर आहे. उद्योगधंद्यांमध्ये आंध्र प्रदेशाने पहिले स्थान पटकावले आहे.
2015 साली पहिल्या क्रमांवर असलेल्या गुजरातची मात्र तिसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशने उद्योगात बाजी मारली आहे. नीती  आयोगाने 340 निकष लक्षात घेऊन ही आकडेवारी जाहीर केली. महाराष्ट्राची उद्योगात घसरण होणे, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चिंताजनक बाब  आहे. कारण उद्योग वाढवणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांचा उद्योगात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा दावा खोटा ठरल्याची चिन्हे  आहेत. उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करणे, जाचक अटी सोडवण्यात महाराष्ट्राला अपयश आले असल्याचे निती आयोगाने म्हटलें आहे.