Breaking News

अग्निशमन विभागात होणार 26 पदांची भरती

औरंगाबाद, दि. 03 - महापालिकेच्या अग्निशमन विभागात अग्निशमन वाहने आहेत; मात्र त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ कमी आहे. यासाठी तातडीने 26 प्रशिक्षित कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. फटाका बाजाराला लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ही माहिती दिली.
गेल्या शनिवारी दि. 29 जिल्हा परिषदेच्या मैदानावर फटाका मार्केटमध्ये लागलेल्या आगीत 140 दुकाने भस्मसात झाली. या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कमी  पडली, या पार्श्‍वभूमीवर मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना निलंबित करण्यात आले.