औरंगाबादमध्ये अग्नितांडव, फटाक्यांच्या दुकानात भडका
औरंगाबाद, दि. 29 - औरंगाबादमध्ये फटाक्यांच्या दुकानांना भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या, पाण्याच्या गाड्या आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मैदानातील सर्वच्या सर्व 150 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे म्हटले जात आहे. तर 25 ते 30 चारचाकी आणि अनेक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा परिषद मैदानात फटाक्यांचा बाजार भरतो. मात्र आज तिथे एका स्टॉलला आग लागली. मैदानात साधारण 150 दुकाने आहेत. दुकाने एकमेकांना लागूनच असल्याने आग पसरली. आगीनंतर फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने परिसर दणाणला आहे. या मैदानाच्या शेजारीच रहिवासी इमारती असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. रहिवासी परिसर सोडून सुरक्षित स्थळी धाव घेत आहेत.
मैदानातील सर्वच्या सर्व 150 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे म्हटले जात आहे. तर 25 ते 30 चारचाकी आणि अनेक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा परिषद मैदानात फटाक्यांचा बाजार भरतो. मात्र आज तिथे एका स्टॉलला आग लागली. मैदानात साधारण 150 दुकाने आहेत. दुकाने एकमेकांना लागूनच असल्याने आग पसरली. आगीनंतर फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने परिसर दणाणला आहे. या मैदानाच्या शेजारीच रहिवासी इमारती असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. रहिवासी परिसर सोडून सुरक्षित स्थळी धाव घेत आहेत.