Breaking News

सर्वसंमतीने समान नागरी कायदा आणणार - वैंकय्या नायडू

नवी दिल्ली, दि. 27 - समान नागरी कायदा सर्वसंमतीने लागू केला जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री वैंकय्या नायडू  यांनी केले. भारतीय जनता पक्ष वादग्रस्त मुद्यांच्या आधारे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लढणार असल्याबाबत केल्या जाणार्‍या आरोपांचे त्यांनी खंडन केले.
उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुका विकासाच्या मुद्यावरच लढल्या जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. तोंडी तलाक, समान नागरी कायदा आणि राम मंदिराचा  मुद्दा असणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तोंडी तलाक प्रथेला आम्ही धार्मिक मुद्दा मानत नाही. मुस्लीम समुदायाचा हा संवेदनशील विषय आहे. मुस्लीम समुदायाच्या  अंतर्गत विषयात सरकार हस्तक्षेप करत आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.