Breaking News

अन्यथा भारताविरूद्ध 5-0 पराभव निश्‍चित : मायकल वॉन

मँचेस्टर, दि. 27 - इंग्लंडच्या फलंदाजांनी आपली कामगिरी सुधारण्याकडे लक्ष द्यावे. तसे न झाल्यास भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा  5 - 0 ने पराभव निश्‍चित आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने व्यक्त केले आहे. भारत - इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या  मालिकेला नोव्हेंबरमध्ये सुरूवात होणार आहे.
गेल्या काही महिने मी इंग्लंडची फलंदाजी पाहतो आहे. कसोटी सामन्यातदेखील 30 किंवा त्या पेक्षा धावांवर त्यांचे तीन गडी बाद झालेले असतात. डावाला  अशाप्रकारची खराब सुरूवात मिळाल्यास भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडचा निभाव लागणे कठीण आहे. आणि तसे झाले तर, इंग्लंडच्या संघावर ‘व्हाईटवॉश’ची  नामुष्की ओढवेल, असे वॉन म्हणाला.