Breaking News

जवानांच्या सुविधांबाबत राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली, दि. 29 - जवानांना ज्या गोष्टी मिळण्याचा अधिकार आहे त्या सर्व गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.  
अपंगांनाही निवृत्त वेतन दिले जावे, नुकसान भरपाई दिली जावी, सामान्य कर्मचा-यांप्रमाणे त्यांनाही सुविधा मिळाव्यात, ’एक पद, एक वेतन’ योजनाही योग्य पद्धतीने राबवली जावी. जेणेकरून माजी सैनिकांची कोणत्याही प्रकारची तक्रार राहू नये, अशा अन्य काही मागण्या त्यांनी या पत्राद्वारे केल्या आहेत.
गांधी यांनी सातव्या वेतन आयोगाबाबतही पत्रात उल्लेख केला आहे. त्यात म्हटले आहे की, या आयोगात ज्या चुका, त्रुटी आहेत. त्यात लवकरात लवकर सुधारणा केल्या पाहिजेत. जवानांच्या प्रती आम्ही आभारी आहोत, असा संदेश या दिवाळीला जवानांपर्यंत पोहोचला पाहिजे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.