Breaking News

शेतकरी, निराधारांच्या हक्कासाठी हल्लाबोल मोर्चा

बुलडाणा, दि. 24 - शेतकरी व निराधारांच्या हक्काच्या मागणीसाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मधुकरराव गवई जेष्ठ नेते आंदोलन सम्राट यांचे नेतृत्वात प्रचंड हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाटीका येथून निघून लोणार वेस सराफा गल्ली वरुन मुख्य रस्त्याने एस.डी.ओ. कार्यालयावर धडकला. यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर करण्यात आले. जाहीर सभेचे अध्यक्ष मधुकरराव गवई होते.
सर्वप्रथम महामानवाला पुष्पहार घालण्यात आले. मोर्चाचे आयोजन सौ.पंचफुलाबाई अंभोरे महिला नेत्या यांनी केले होते. जाहीर सभेला मार्गदर्शन करतांना मधुकरराव गवई म्हणाले की, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत मी शेतकरी व निराधार, सर्व सामान्यांच्या हक्कासाठी लढत राहीन. यावेळी सौ.पंचफुलाबाई अंभोरे महिला नेत्या, शिवाजीराव नवघरे, जगदीश अवचार, सिकंदर मौलाना, अख्तरभाई चुडीवाले, दामु आण्णा ढोणे, लालाभाई कुरेशी, गोकर्णाबाई मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कन्हैया मोरे, संचलन गजानन जाधव यांनी केले. मोर्चेकरी मोर्चाचे निवेदन एस.डी.ओ. अपार यांना देण्याकरीता गेले असता ते कार्यालयात आढळून आले नाहीत. त्यामुळे मोर्चेकर्‍यांनी प्रचंड नारेबाजी यावेळी केली. तहसिलदार काकडे यांनी येवून सदर निवेदन स्विकारले.
शेतकर्‍यांच्या पिक विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा न करता शेतकर्‍यांना पिक विम्याची रक्कम वाटप करावी. शासनाने सं.गा.नि.यो.च्य लाभार्थ्यांचे अनुदान दरमहा 1000 रुपये मंजूर करावे. रेशनकार्ड धारकांना नियमीत गहू, साखर, तांदुळ, घासलेट देण्यात यावे. आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी राहूबाई वानखेडे, गुंफाबाई गवई, लताबाई अंभोरे, मंगलाबाई इंगळे, कमलाबाई घेवंदे, सुनिता देबाजे, कुसूमबाई सुखदाणे, गुंफाबाई अंभोरे, लालबी सय्यद गुलजार, प्रमीला घेवंदे, पदमाबाई वानखेडे, जाईबाई मोरे, कमल खोडके, मणकर्णा थोरात, वच्छलाबाई दाभाडे, कांताबाई नखाते, शोभा जोहरवाल, मिनाबाई माने, त्र्यंबक खंडारे यांच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी, निराधार महिला उपस्थित होत्या.