घरात कुटुंबावर संस्काराची गरज ः पाचपुते
श्रीगोंदा (प्रतिनिधी) । 19 - पूर्वी एकत्र कुटुंब पध्दती होती त्यामुळे प्रत्येकावर लक्ष होते आणि संस्कार होते आज जसे दिवस बदलत आहेत तरी माणसाची नितिमंता बदलत आहे .संस्कार राहिले नाही त्यामुळे घरातच मुलांवर योग्य संस्कार झाले असते तर कोपर्डी सारखी घटना घडली नसती आसे मत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी बोलताना व्यक्त केले.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे आज दि.18 रोजी सकाळी 9वाजता कोपर्डी येथील घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण गाव बंद ठेऊन गावातील भैरवनाथ मंदिरात सर्व पक्षीय शोक सभा घेण्यात आली .त्यावेळी बोलताना मा.मंत्री पाचपुते म्हणाले कर्जत तालुक्यातील कोपर्डी मध्ये एका गरिब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला अतिशय निधंनिय अशी घटना कि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली कायदा कडक नाही कायद्याला पळवाटा वाढल्या आणि गुन्हेगारी वाढत आहे याला आळा घालण्यासाठी कायद्यात बदल गरजेचे आहे आरोपीने केलेले कृत्य त्याला लवकरात लवकर अटक करुण फास्ट कोर्टात केस चालऊन शिक्षा झाली पाहिजे जेणे करुन पुन्हा असे घडणार नाही यासाठी प्रत्येक गावात एकोपा हवा आपली मुल बाहेर काय करतात यांची माहिती पालकांना पाहिजे त्यासाठी प्रत्येक घरात संस्काराची गरज आहे .
अरूणराव पाचपुते म्हणाले राजकारणी खुर्ची साठी एकत्र येतात पण अन्याया विरोधात येत नाही कोपर्डीच्या घटनेने महाराष्ट्र पेटला असुन गावोगाव बंद ठेऊन रस्ता रोको करुण लोक निषेध करित आहे यामुळे मुलीनी यापुढे झाशीची राणी बनुन राहणे चुकिचे वागणार्याला भर चौकात मुलीनी एकत्र येऊन मारल पाहिजे तर प्रतेकाला कस वागाव कळेल.
यावेळी डा.प्रतिभा पाचपुते.आखोसे.प्रा.सुनिल माने.माऊली पाचपुते.वैभव पाचपुते. चांगदेव पाचपुते अंबादास पाचपुते.शशिकांत जाधव.लता अंभग.हरिभाऊ पाचपुते. नंदा पाचपुते सुवर्णा पाचपुते यांच्या सह मान्यवरानी पोटतिडकिने आपल्या भावना व्यक्त केल्या त्यावेळी सरपंच मंगल जगताप उपसरंपच दिलीप दरेकर.ज्ञानेश्वर पाचपुते.सुनिल पाचपुते शहाजी भोसले लालासाहेब फाळके. संदिप पाचपुते बन्सी पाचपुते यांच्या सह गावातील ग्रामंस्थ महिला शाळेचे मुल मुली मोठ्या संख्येने हजर राहून गावात मुख फेरी काढून निषेध केला आहे .
दरम्यान, मातंग युवक संघटनेच्यावतीने श्रीगोंदा तालुक्याचे तहसिलदार वंदना खरमाळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्राला लाज वाटेल अशी घटना अहमदनगर नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोपर्डी गावात घडली असून या गुन्ह्यात समावेश असणार्या नराधमांना फाशी पेक्षाही कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी मातंग युवक संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार ससाणे यांनी केली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात, कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिचा निर्घुण खून करून शरीराची अतिशय विकृतपणे विटंबना करण्यात आली होती. या सैतानी नराधमांना पोलीस प्रशासनाने अटक करण्यात दिरंगाई केली असून राज्य शासनाने सुद्धा पिडीत मुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यास विलंब लावला. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेऊन लवकरात लवकर आरोपींना फाशी पेक्षाही कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच पिडीत मुलीच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी केली. यावेळी माजी नगरसेवक अनिल ससाणे, सचिन पाटोळे, मनोज घाडगे, नितीन नेटके, दिपक घोडके यांसह बहुसंख्य मातंग बांधव उपस्थित होते.
