Breaking News

आठ लाख कोटींचे करार म्हणजे जनतेची निव्वळ फसवणूक - राणें

मुंबई, 21 -  आठवडाभरात 8 लाख कोटींचे करार करणे म्हणजे जनतेची निव्वळ फसवणूक आहे. ‘जेएनयू’तील आंदोलनानंतर भाजपाचे नेते राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी देत आहेत. त्यांना जशा तसे उत्तर देण्याची ताकद काँग्रेसमध्ये आहे, असा इशाराही राणेंनी दिला. 
पक्षाच्या गांधी भवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राणेंनी भाजप सरकारचा समाचार घेतला. ‘कोणतेही करार होण्यापूर्वी संबंधित कंपनीशी किमान दोन-तीन वर्षे चर्चा केली जाते. त्यांना जागा, परवानग्या, मनुष्यबळाबाबत त्यांचे समाधान करावे लागते. मात्र फडणवीस सरकारने अवघ्या आठवडाभरात 8 लाख कोटींचे करार करणे म्हणजे जनतेची निव्वळ फसवणूक आहे. राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी पुरेसे नियोजन असावे लागते. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात ते दिसले नाही. आठ वर्षांत आठ लक्ष कोटींची गुंतवणूक येणार असा आकडा सांगण्यात आला आहे. 2594 सामंजस्य करार झाल्याचे सांगितले जाते. मात्र कोणते उद्योग येणार, त्यांना कुठे जागा देणार, गुंंतवणूकदारांची आर्थिक क्षमता काय याबाबत काहीच सांगितले जात नाही. ही माहिती विस्तृत सांगणारी पुस्तिका सरकारने काढावी’, अशी मागणी राणें यांनी केली.