Breaking News

देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था गंभीर - सोनिया गांधी


नवी दिल्ली, 4 - देशामधील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था गंभीर‘ असल्याचे मत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवार व्यक्त केले. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना गांधी यांनी आदरांजली वाहिली आहे. 
याचबरोबर, गांधी यांनी हवाई दलाची व्यूहात्मकदृष्टया अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली ठिकाणे; आणि लष्करात कार्यरत असलेल्या जवान-अधिकार्‍यांच्या कुटूंबीयांविषयी यावेळी काळजी व्यक्त केल्याचे काँग्रेस पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. पठाणकोट हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि परराष्ट्र मंत्रालयामधील उच्चस्तरीय अधिकार्‍यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी संवेदनशील बैठक सुरु आहे. एनएसजी आणि लष्कराच्या कमांडोंनी येथील हवाई तळाच्या संपूर्ण परिसराची झाडाझडती सुरू केली.