Breaking News

मनूच्या विचाराचे समर्थन राज्य सरकार करत नाही : मुख्यमंत्री


नागपूर : राज्य सरकार मनूच्या विचारांचे समर्थन करणारे नाही. हे राज्य संविधानावर चालवले जाते, असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. संभाजी भिडेंनी मनूच्या श्रेष्ठत्वाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती. याबाबत स्पष्टीकरण देत सरकारने आपली भू मिका स्पष्ट केली आहे. संभाजी भिडे यांचे वक्तव्य तपासण्यात येईल. संविधानाच्या विरोधात ते वक्तव्य असेल, तर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासनदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. मनू हे संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकारामांपेक्षा श्रेष्ठ आहेत, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी पालखी सोहळ्यात केले होते. या वक्तव्याचा निषेध करत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली होती.