Breaking News

भिडे विरोधात संभाजी ब्रिगेडची तक्रार दाखल


पुणे - मनू हा संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता असे वक्तव्य करून संभाजी भिडे यांनी आणखीन एक वाद ओढवून घेतला आहे. या त्यांच्या वक्त व्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुण्यात आलेल्या संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात आपल्या अनुयायांसमोर बोलताना मनुने गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालण्यास शिकवले. मनू हा संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता. ज्यांचा हिंदुत्वावर विश्‍वास आहे त्यांनी गावागावात जाऊन संमेलने घ्यावीत. सध्या देशाला वाचविण्यासाठी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याची गरज आहे. तसेच बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य पाहिजे पण ते वढू, रायगडाला मान्य नसल्याचे सांगत त्यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीलाही विरोध केला, असे वक्तव्य केले होते.