Breaking News

अकरावी- बारावीच्या प्रवेशाला मुदतवाढ देणार मुख्यमंत्र्यांचे संकेत

नागपूर : शहरासह पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचे विधानसभेत चांगलेच पडसाद उमटले. त्यामुळे विरोधकांनी अतिवृष्टीचा आढावा घेण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणमंत्र्यांनी अतिवृष्टीचा आढावा घ्यावा. तसेच अतिवृष्टीमुळे अकरावी आणि बारावीच्या प्रवेशाच्या समस्या निर्माण झाल्या असतील, तर प्रवेशाची मुदत वाढवून दिली जाईल असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की शक्य असेल, त्या शैक्षणिक संस्थांनी सुट्टी जाहीर करावी असे स्पष्ट केले. 
मुंबईमध्ये 10:45 पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शहरात 11 ठिकाणी पाणी तुंबले आहे. वसई -विरारमध्ये अतिवृष्टी झाल्याने लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सध्या बंद आहेत. भरतीची वेळ असल्याने मुंबई महापालिका आणि आपत्कालीन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक असलेल्या ठिकाणी पाणी क ाढण्यासाठी पंप लावले