Breaking News

रथाला बैलजोडी जोडू इच्छिणार्‍यांनी 12 जून पर्यंत अर्ज


पुणे - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला बैलजोडी जोडू इच्छिणार्‍यांनी 12 जून पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे करण्यात आले आहे.जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 333 वा पालखी सोहळा श्री क्षेत्र देहु येथून 5 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपुरास प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी सोहळ्यातील रथाला बैल जोडी जोडण्यात येते. त्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.आपली बैलजोडी पालखी रथाला जोडू इच्छिणार्‍यांनी 5 ते 12 जून या कलावधीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर येणार्‍या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे संबंधितांनी दिलेल्या मुदतीत संस्थानच्या श्री क्षेत्र देहू येथील कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष हभप पंढरीनाथ मोरे यांनी केले