रेल्वे रूळ ओलांडतांना चौघांचा मृत्यू
मुंबई - लोकलने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवलीत घडली आहे. बोरिवली-कांदिवलीदरम्यान पोईसरजवळ हा अपघात झाला आहे.बोरिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोईसरजवळ ट्रेनचा वेग मंदावला. यादरम्यान ट्रेनमधील चौघे प्रवासी खाली उतरले. मात्र, त्याचवेळी विरुद्ध दिशेने ट्रेन वेगाने येत होती. त्याखाली ते सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 सख्ख्या तर 2 चुलत भावांचा समावेश आहे. सागर संपत चव्हाण (वय 23), साईप्रसाद मनोहर चव्हाण (वय 17), मनोज दिपक चव्हाण (वय 17), दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (वय 20) अशी मृतांची नावे आहेत.