Breaking News

हे शेतकरी व उद्योजकांचे सरकार : अमित शाह

नवी दिल्ली - मोदी सरकारने समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. शेतकरी विरोधी किंवा उद्योजक विरोधी सरकार, असा आरोप या सरकारवर कोणीही लावू शकत नाही, असे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले. हे शेतकरी व उद्योजकांचे सरकार आहे. एकच सरकार शेतकर्‍यांना मदतीसाठी व उद्योजकांच्या भरभराटीसाठी कसे काय काम करू शकते ?, या चर्चेला आमच्या सरकारने पूर्णविराम दिला, असे अमित शाह यांनी माध्यमांना सांगितले. मोदी सरकारच्या 26 मे रोजीच्या चतुर्थ वर्ष समारंभापूर्वी आयोजित पत्रकारांच्या सभेत शाह यांनी ही माहिती दिली. भाजप सरकारने लोकशाहीला बळकट बनवले, असे शाह यांनी सांगितले. मागील चार वर्षात आमच्या सरकारने जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा बदलवली, असेही शाह म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या कामगिरीविषयीचे पावर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले.