Breaking News

धनगर समाजाचा 22 मे रोजी मंत्रालयावर ढोल गर्जना मोर्चा


सोलापूर, दि. 14, मे - धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचे दिलेले आश्‍वासन पाळले नाही. भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याची समाजाची भावना झाली आहे. झोपेचे सोंग घेणार्‍या सरकारला जागे करण्यासाठी मंत्रालयावर 22 मे रोजी ऐतिहासिक असा ढोल गर्जना मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला.
 
मुंबईच्या आझाद मैदानावर होणार्‍या आंदोलनासाठी राज्यभर प्रचार दौरा सुरू आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्‍वासन फडणवीस सरकारने पाळलेले नाही. सत्तेवर येताच ’टीस’ समितीवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवली. सोलापूर विद्यापीठ नामांतरप्रश्‍नी शासनाने फसवणूकच केली आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे. आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या 225 बैठका झाल्या, पण निर्णय नाही. एक-दोन वर्षे जेलमध्ये राहिले म्हणून काय झाले, अशी टिपण्णी केली.