संवत्सर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला केवळ तीनच सदस्य उपस्थितीत
परजणे यांनी याबाबत निवेदनात म्हटले आहे की, 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस. त्याचे विषेश महत्व आहे, मात्र संवत्सर ग्रामपंचायतीने त्यास हरताळ फासला. यावर गावात ग्रामसभेचे आयोजन केले. मात्र त्यास 17 पैकी अवघे तीनच सदस्य उपस्थित राहिले. शासनांच्या तसेच ग्रामपंचायत स्तरावर असणार्या विविध योजनांची माहिती ग्रामसभेतून नागरिकांना दिली जाते. मात्र पंचायत राज दिनाला याबाबत कुठलीही माहिती दिली गेली नाही. समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामसभेला विशेष अधिकार देवून त्याबाबत मोठी जनजागृती केली, पण संवत्सर ग्रामपंचायतीचे सदस्यांनी या घटनेस हरताळ फासला आहे. या ग्रामसभेत भाजपाचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ कासार, संजीवनी बँकेचे संचालक राजाभाऊ परजणे, प्रविण भोसले आदिंनी गावपातळीवरील सामाजिक योजनांची माहिती व संवत्सर ग्रामपंचायतींने त्यावरील कार्यवाहीबाबत विचारणा केली असता, ग्रामसेवक अहिरे यांना त्याविषयी उत्तरे देता आली नाही.