Breaking News

यूपी, एमपी, बिहारमुळे भारत मागास : अमिताभ


दक्षिण आणि पश्चिम भारतातील राज्यांनी झपाट्याने प्रगती केली; पण बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश व राजस्थान यांसारख्या राज्यांमुळे भारत मागास राहिला, असे प्रतिपादन नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी केले. जामिया मिलिया विद्यापीठात आयोजित खान गफ्फार खान स्मारक व्याख्यानमालेत ते बाेलत होते. ते भारताची बदलती आव्हाने' या विषयावर बोलत होते.