सहकार चळवळीने 25 वर्षांत शेतीची प्रगती झाली - आमदार थोरात
शारदानगर येथे पद्मश्री अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्काराचे वितरण माजी कृषीमंत्री आमदार थोरात यांच्या हस्ते झाले.त्याप्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार होते.यावेळी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार,विश्वस्त सौ.सुनंदा पवार,विश्वास देवकाते,नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे,संजय भोसले,विजय बोराडे,डॉ.व्यंकट मायंदे,डॉ.नारायण हेगडे,अशोक गायकवाड,डॉ.एस.एन.जाधव, डॉ.सुदाम अडसूळ,डॉ.शंकरराव मगर,राजीव देशपांडे,रणजित पवार, डॉ.अविनाश बारवकर,विष्णुपंत हिंगणे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले कि,रायातील शेतीतील प्रगतीच्या क्रांतीचे अग्रदूत खरेतर डॉ.अप्पासाहेब पवार, डॉ.मणिभाई देसाई,वसंतदादा पाटील,शरद पवार असे सर्व होते.अप्पासाहेब पवार हे संगमनेर तालुक्यासाठी व माझ्यासाठी खूप जवळचे मार्गदर्शक होते.डॉ.अण्णासाहेब शिंदे,डॉ.देसाई व डॉ.अप्पासाहेब हे हरितक्रांतीतील अग्रदूत होते.शेतीसाठी आधुनिकतेसाठी शेतकर्याला प्रोत्साहीत करणे, ठिबकद्वारे पाणी देणे यासाठी अप्पासाहेबांनी खूप मोठे योगदान दिले.त्यांच्यानंतरही हे काम राजेंद्र पवार अधिक वेगाने पुढे नेत आहेत हे कौतुकास्पद आहे.आज शेतीत कोणतेही अडचणीचे प्रश्न आले तर सर्वांना एकमेव आधार पवारसाहेबच आहेत.एवढेच नाही तर दिल्लीतही भाजपपासून सर्व पक्षांचे शेतकरी नेते पवारसाहेबांकडे आधारवड म्हणूनच पाहतात.त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढील काम करावे लागेल.केंद्रात पवारसाहेब कृषीमंत्री होते म्हणूनच महाराष्ट्रात मी कृषीमंत्रीपद घेतले.तो सहा वर्षांचा कालखंड माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा होता.सन 2007 मध्ये सर्वाधिक उत्पादन व शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळाले.यामागे पवारसाहेबांचे कर्तृत्व,नेतृत्व व त्याचा असलेला अभ्यास महत्वाचा होता.देशातला कृषी विभाग व कृषी विद्यापीठांचे त-ाही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालील कृषी मंत्रालयाचा कालखंड सर्वात चांगला होता असे ही ते यावेळी म्हणाले.