Breaking News

कृषि राज्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनाच काम कसे ?

पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या खात्याच्या तुरडाळीवरुन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या खात्यातील घोटाळ्याकडे आपला मोर्चा वळविताना कृषी विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या साहित्य वाटपाचे मंत्री महोदयांच्या गावातील काम त्यांच्या भाच्यांनाच आणि या योजनेतील कृषि साहित्य त्यांच्या नातेवाईकांनाच कसे मिळते, असा सवाल करीत या संपूर्ण कृषि साहित्य वाटपाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.