भगवानगड परिसरातील 5 हजार ग्रामस्थांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
अहमदनगर, दि. 26, सप्टेंबर - भगवानगडावर कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेण्यात येऊ नये अश्या आशयाचे निवेदन खरवंडी कासार व भगवानगड परिसरातील ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकार्यांना दिले.यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.
भगवानगड हे आमचे श्रद्धास्थान आहे.या ठिकाणी आम्हा भासविकांना राजकीय मेळावा नको आहे .मागील वर्षी या कारणावरून प्रचंड हाणामारीची झाली.त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर या वर्षी कोणत्याही राजकीय मेळाव्यास परवानगी देऊ नये,तसेच उपोषणाला बसण्यासही परवानगी प्रशासनाने देऊ नये अशा प्रकारचे निवेदन या वेळी या देण्यात आले.त्याच प्रमाणे गड व गडावरील महंत यांची सुरक्षा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे याची जाणीव ठेवून प्रशासनाने त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन करावे असेही त्या निवेदनात म्हटले आहे.
खरवंडी, मालेवाडी,ढाकणवाडी,काटेवाडी,मिडसांगवी,भारजवाडी,कीर्तनवाडी या सर्व वाड्यावस्त्यावरील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.निवेदनावर पाच हजार ग्रामस्थांनी संमतीदर्शक स्वाक्षर्या केलेल्या आहेत.कसल्याही परिस्थिती मध्ये सभा होऊ द्यायची नाही असा पवित्रा या वेळी आंदोलकांनी घेतला.
भगवानगड हे आमचे श्रद्धास्थान आहे.या ठिकाणी आम्हा भासविकांना राजकीय मेळावा नको आहे .मागील वर्षी या कारणावरून प्रचंड हाणामारीची झाली.त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर या वर्षी कोणत्याही राजकीय मेळाव्यास परवानगी देऊ नये,तसेच उपोषणाला बसण्यासही परवानगी प्रशासनाने देऊ नये अशा प्रकारचे निवेदन या वेळी या देण्यात आले.त्याच प्रमाणे गड व गडावरील महंत यांची सुरक्षा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे याची जाणीव ठेवून प्रशासनाने त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन करावे असेही त्या निवेदनात म्हटले आहे.
खरवंडी, मालेवाडी,ढाकणवाडी,काटेवाडी,मिडसांगवी,भारजवाडी,कीर्तनवाडी या सर्व वाड्यावस्त्यावरील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.निवेदनावर पाच हजार ग्रामस्थांनी संमतीदर्शक स्वाक्षर्या केलेल्या आहेत.कसल्याही परिस्थिती मध्ये सभा होऊ द्यायची नाही असा पवित्रा या वेळी आंदोलकांनी घेतला.