Breaking News

एमआयडीसीमधील स्फोटात तिघांचा मृत्यू

मुंबई : पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी परिसरातील कंपनीत झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जीवितहानी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या आगीमुळे शेजारील 6 कंपन्या जळुन खाक झाल्या आहेत. यात नोवाफेना, आरती ड्रग्ज, भारत रसायन, प्राची, युनिबैक्स, दरबारे केमिकल या कंपन्याचा समावेश आहे.


गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास येथील नोवाफेना रासायनिक कंपनीत स्फोट झाले. स्फोट इतका भयंकर होता की तारापूरसह पालघर, सातपाटी, चिंचणी आदी आजूबाजूचा 15 कि लोमीटर पर्यंतचा परिसर भूकंप झाल्यासारखा हादरला. स्फोटामुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य अद्याप सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.