Breaking News

पालवेच्या प्रयत्नांना यश


पाथर्डी तालुक्यातील, शिरसाठवाडी येथील सिंगलफेजचे रोहित्र बर्‍याच दिवसांपूर्वी जळाल्याने, या रोहित्रावर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजजोड असल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तसेच वीजेवर चालणारे पंखे बंद पडल्यामुळे उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश पालवे यांनी, पाथर्डी महावितरणाचा प्रभारी कामकाज सांभाळत असलेले उपकार्यकारी अभियंता आडभाये व कक्ष अभियंता सिंग यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे नवीन रोहित्र बसवला गेला. त्यामुळे शिरसाठवाडी ग्रामस्थांची समस्येतून मुक्तता झाली. यामुळे आविनाश पालवे यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.