Breaking News

मोरगाव अर्जुनी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा


गोंदिया - राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांनी विविध समस्यांना घेऊन गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा क ाढला. या मोर्चात राष्ट्रवादी पक्षाचा विविध पदाधिकारी सह शेतकरी व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. तर विशेष म्हणजे 16 फेब्रुवारी पासून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वच गावात राष्ट्रवादी काँगेस पक्षातर्फे शेतकरी सन्मान दिंडी व जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाची सांगता देखील या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने यावेळी करण्यात आली. भाजप सरकारच्या काळात धान्याला न मिळालेला हमी भाव, जिल्ह्यात कमी पाऊस झाला असला तरीही जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित का करण्यात आला नाही, शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी तसेच पिकविम्याच्या माध्यमातून शेतकर्‍याची होत असलेली फसवणूक अशा विविध मुद्द्याला घेऊन भाजप सरकारच्या निषेर्धार्थ हा मोर्चा काढण्यात आला. तर हल्लाबोल मोर्चा दरम्यान सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.