Breaking News

भगवान महाविरांचे विचार सर्वांना मार्गदर्शक : कोल्हे


कोेपरगांव, भगवान महावीरांनी संपूर्ण जगाला एकतेची शिकवण देत समाज एकसंघ ठेवण्यासाठी अनंत प्रयत्न केले आहेत. त्यांचे विचार आजही सर्वांना मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे विश्वस्त संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.
शहरात जैन बांधवांच्यावतीने महावीर जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी भगवान महाविरांच्या प्रतिमेची सजविलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अतुल काळे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, महावीर दगडे, माजी नगरसेवक बबलु वाणी, आजिनाथ ढाकणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, विधीज्ञ रविंद्र बोरावके, वैभव आढाव, विवेक सोनवणे, संजीवनीचे संचालक प्रदिप नवले आदींसह शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जैनबांधव विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. नगरपालिका व तमाम जैन बांधवांच्यावतीने चारबत्ती चौकात मुख्य रस्त्यावर अहिंसा स्तंभाचे नूतनीकरण करण्यात आले.