Breaking News

राज्यातील 35 लाख शेतकर्‍यांचे कर्ज माफ

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी राज्यातील 35 लाख शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाल्याचा दावा केला आहे. त्यासाठी आतापर्यंत 13 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यात रोजगारनिर्मितीवर भर देण्यास शासन कटीबद्ध असल्याचे अर्थमंत्री म्हणाले.

यासाठी आण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 300 कोटी रुपयांची, तर इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.