Breaking News

केवळ घोषणाबाज सरकार : विखे पाटील


सरकारने शेतक़र्‍यांच्या तोंडाला पाणी पुसले असून हे केवळ घोषणेबाज सरकार असून, सरकार तरतूद करत आहे पण जनतेच्या हातात भोपळा दिसत आहे. जुन्या योजनांची नावे बदलली मात्र त्यात भरीव तरतूद करण्यात आली नाही त्यामुळे हे सरकार गेम चेंजर नसून नेम चेंजर आहे, अशी सडकून टीका विखे पाटील यांनी यावेळी केली. शेतकरी आत्महत्या होत असताना कविता का सादर केल्या अर्थसंकल्प होते की कवी संम्मेलन होते, असा सवाल विखे पाटील यांनी सरकारला केला आहे.