Breaking News

डोंबिवलीत 11 तास वीज गायब


डोंबिवली  - पश्‍चिमेकडील बहुसंख्य भागात काल मध्यरात्री 2 वाजता वीज पुरवठा खंडीत झाला. उन्हाळ्यात मोसमात तब्बल 11 तास वीज गायब झाल्याने नाग रिक हैराण झाले होते. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना उकाड्याचा त्रास झाला.महावितरणचे अतिरिक्त उपअभियंता अविनाश कलडोणे यांना याबाबत विचारले असता त्यांनी पाल सबस्टेशन मधून डोंबिवली येणार्‍या वीज पुरवठ्यातील ब्रेकर मध्ये बिघाड झाल्याचे सांगितले. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. काही भागात मंगळवारी सकाळी तर क ाही भागात दुपारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मार्च महिन्यात प्रचंड उन्हाळा वाढण्याने विजेची मागणी वाढत आहे. मात्र रात्रीच्या वेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता.