वनकुटे गावात गोसावी समाजास दफनभूमी मिळण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील वनकुटे गावात गोसावी समाज बांधव पुर्वापार रहात आहे. तसेच गोसावी समाजात निधनानंतर धार्मिक रूढी परंपरेनुसार दफन करण्याचा म्हणजेच समाधी देण्याची प्रथा प्रचलित आहे. तसेच दररोज समाधी पुजा करणेही अत्यंत महत्त्वाचे असुन समाधी बांधणे महत्वाचे मानले जाते. परंतु वनकुटे गावात गोसावी समाजास दफन भुमीसाठी जागाच नसल्याने निधनानंतर दफन करण्यास अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत असुन, भविष्यातही अडीअडचणी निर्माण होउ शकतात. यासाठी दफन भुमीसाठी जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे.