Breaking News

मनमाड उपजिल्हा रूग्णालयातील बनले हायटेक,धावत्या रेल्वेतच तयार होतो लब रिपोर्ट

मनमाड प्रतिनिधि सपूर्ण देश डिजिटल होत असताना सरकारी कर्मचारी या स्पर्धेत मागे कसे राहणार? मनमाड ग्रामिण उप जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांनीही स्वतःला हायटेक बनवत कामकाज प्रारंभ केल्याने मनमाडकर जनतेचे आरोग्य धावत्या रेल्वेच्या वेगासोबत अपडाउन होऊ लागले आहे.आरोग्य कर्मचारी घरी जाताना रेल्वेतच रिपोर्ट तयार करून पाठविण्याचा शहाजोगपणा सुरू केल्याने रूग्णांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या प्रक्रीयेतून मोबाईल वर चुकीचा रिपोर्ट देऊन एका महिलेला नसलेले आजार सांगितल्याने त्या महिलेच्या जीवताशी खेळण्याचा प्रयत्न झाला. अशा बिनडोक विद्वानवीरांच्या कामगिरीनंतर अडचणीत आलेल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांनी यापुढे असे प्रकार घडणार नाहीत असा निर्वाळा देत सारवासारवा करण्याचा प्रकार केला आहे. जणू काही घडलेच नाही असा या मंडळींचा एकूण कार्यभाव आहे. हा निंदनीय आणि तितकाच गंभीर प्रकार असून शिवशाहीचा डिंगोरा पिटणारे राज्याचे आरोग्य मत्री डॉ दीपक सांवत काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनमाड शहर नाशिक जिल्हातील नबर 3 चे शहर म्हणून ओळखले जाते.या शहराची लोकसख्या झपाट्याने वाढत असून मनमाड सह 30 ते 35 गावातील लोकांचे स्वास्थ राखण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय या ठिकाणी सेवा देत आहे. सदया हे ग्रमीण रुग्णालय डॉक्टर व कर्मचार्यांच्या फाजील आत्मविश्‍वासातून निपजलेल्या गलथानपणामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे .परिणामी मनमाड नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे 


मनमाड येथील ग्रमीण रुग्णालय येथे काम करणारे कर्मचारी हे आपल्या कर्तव्यात कामचुकार पणा करित असल्याचे प्रकार वारवार घडत असल्याने या रुग्णलयात चालेले आहे तरी काय असा प्रश्‍न सामान्यांना पड़ला आहे मनमाड शहरातील कँप भागात राहणार्‍या ताराबाई आव्हाड याची प्रकृति अचानक बिघडल्याने त्याना तत्काळ मनमाड उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांची तपासणी करुन बीपी वाढल्याचे निदान केले.सपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला देत रुग्णालयाच्या लब मध्ये सर्व तपासण्या करण्यात आल्या.तीन वाजता मिळणार होता.तत्पूर्वीच आरोग्य कर्मचार्यांनी रूग्णालय आवार सोडून नाशिक निवासी घरट्याकडे प्रयाण करण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठले.रेल्वे पकडून नाशिककडे प्रयाणही केले.रिपोर्ट मिळाला नाही म्हणून रूग्ण महिलेच्या मुलाने वैद्यकीय अधिकार्यांकडे तक्रार केली.वैद्यकीय अधिकार्यांना लब कर्मचार्यांची दैनंदिनी माहीत असल्याने त्यांनी तातडीने संबंधीतांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून रिपोर्टची विचारणा केली. संबधित लब प्रमुखाने धावत्या ट्रेन मधून मोबाईल वैद्यकीय रिपोर्ट पाठवून दिला.त्या रिपोर्टच्या आधारावर डॉक्टरांनी बीपी आणि शूगर च्या गोळ्या लिहून दिल्या काही गोळ्या उपलब्ध होत्या तर काही दुसर्‍या दिवशी मिळतील असे सांगितले दुसर्‍या दिवशी उरलेल्या गोळ्या व रिपोर्ट घेण्यासाठी सदर महिलेचा मुलगा गेला असता तुमचा कालचा रिपोर्ट चुकीचा दिला गेला तुमची आई नॉर्मल आहे तो दुसर्‍याच महिलेचा रिपोर्ट आहे असे सांगितल्यावर सदर मुलाने डोक्यावर हात मारून घेतला सरकारी दवाखान्याविषयीसंकल्पना मनमाडकरांच्या मनात निर्माण झाली होती तिचा अनुभव आल्याने आईला येथील गोळ्या दिल्या नसल्याचा खुलासा मुलाने केला. आजार नसणार्‍या नागरिकांना आजार लावून त्याची चिता पेटविण्याचे काम हे हायटेक आरोग्य कर्मचारी करीत असल्याची भावना मनमाडमध्ये या प्रकारानंतर व्यक्त केली जात आहे. या प्रकारा बाबत शहरातील सर्वच राजकीय पक्ष आंदोलनाच्या पाविञ्यात असून या घटनेनंतर शिवसेना भाजपा पदाधिकार्यांनी या रुग्णालयात डॉक्टरना धारेवर धरत रुग्णालय बंद पाडण्याचा इशारा दिला या प्रसंगी मनमाड नगरपालिकेचे आरोग्य सभापती लियाकत शेख ,भाजपाचे चिटणीस नारायण पवार ,एकनाथ बोडके ,जितु शिंदे ,तसेच पंडित सानप ,नईम शेख आदि उपस्थित होते.मनमाड प्रतिनिधि सपूर्ण देश डिजिटल होत असताना सरकारी कर्मचारी या स्पर्धेत मागे कसे राहणार? मनमाड ग्रामिण उप जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांनीही स्वतःला हायटेक बनवत कामकाज प्रारंभ केल्याने मनमाडकर जनतेचे आरोग्य धावत्या रेल्वेच्या वेगासोबत अपडाउन होऊ लागले आहे.आरोग्य कर्मचारी घरी जाताना रेल्वेतच रिपोर्ट तयार करून पाठविण्याचा शहाजोगपणा सुरू केल्याने रूग्णांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या प्रक्रीयेतून मोबाईल वर चुकीचा रिपोर्ट देऊन एका महिलेला नसलेले आजार सांगितल्याने त्या महिलेच्या जीवताशी खेळण्याचा प्रयत्न झाला. अशा बिनडोक विद्वानवीरांच्या कामगिरीनंतर अडचणीत आलेल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांनी यापुढे असे प्रकार घडणार नाहीत असा निर्वाळा देत सारवासारवा करण्याचा प्रकार केला आहे. जणू काही घडलेच नाही असा या मंडळींचा एकूण कार्यभाव आहे. हा निंदनीय आणि तितकाच गंभीर प्रकार असून शिवशाहीचा डिंगोरा पिटणारे राज्याचे आरोग्य मत्री डॉ दीपक सांवत काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
मनमाड शहर नाशिक जिल्हातील नबर 3 चे शहर म्हणून ओळखले जाते.या शहराची लोकसख्या झपाट्याने वाढत असून मनमाड सह 30 ते 35 गावातील लोकांचे स्वास्थ राखण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय या ठिकाणी सेवा देत आहे. सदया हे ग्रमीण रुग्णालय डॉक्टर व कर्मचार्यांच्या फाजील आत्मविश्‍वासातून निपजलेल्या गलथानपणामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे .परिणामी मनमाड नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे 


मनमाड येथील ग्रमीण रुग्णालय येथे काम करणारे कर्मचारी हे आपल्या कर्तव्यात कामचुकार पणा करित असल्याचे प्रकार वारवार घडत असल्याने या रुग्णलयात चालेले आहे तरी काय असा प्रश्‍न सामान्यांना पड़ला आहे मनमाड शहरातील कँप भागात राहणार्‍या ताराबाई आव्हाड याची प्रकृति अचानक बिघडल्याने त्याना तत्काळ मनमाड उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांची तपासणी करुन बीपी वाढल्याचे निदान केले.सपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला देत रुग्णालयाच्या लब मध्ये सर्व तपासण्या करण्यात आल्या.तीन वाजता मिळणार होता.तत्पूर्वीच आरोग्य कर्मचार्यांनी रूग्णालय आवार सोडून नाशिक निवासी घरट्याकडे प्रयाण करण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठले.रेल्वे पकडून नाशिककडे प्रयाणही केले.रिपोर्ट मिळाला नाही म्हणून रूग्ण महिलेच्या मुलाने वैद्यकीय अधिकार्यांकडे तक्रार केली.वैद्यकीय अधिकार्यांना लब कर्मचार्यांची दैनंदिनी माहीत असल्याने त्यांनी तातडीने संबंधीतांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून रिपोर्टची विचारणा केली. संबधित लब प्रमुखाने धावत्या ट्रेन मधून मोबाईल वैद्यकीय रिपोर्ट पाठवून दिला.त्या रिपोर्टच्या आधारावर डॉक्टरांनी बीपी आणि शूगर च्या गोळ्या लिहून दिल्या काही गोळ्या उपलब्ध होत्या तर काही दुसर्‍या दिवशी मिळतील असे सांगितले दुसर्‍या दिवशी उरलेल्या गोळ्या व रिपोर्ट घेण्यासाठी सदर महिलेचा मुलगा गेला असता तुमचा कालचा रिपोर्ट चुकीचा दिला गेला तुमची आई नॉर्मल आहे तो दुसर्‍याच महिलेचा रिपोर्ट आहे असे सांगितल्यावर सदर मुलाने डोक्यावर हात मारून घेतला सरकारी दवाखान्याविषयीसंकल्पना मनमाडकरांच्या मनात निर्माण झाली होती तिचा अनुभव आल्याने आईला येथील गोळ्या दिल्या नसल्याचा खुलासा मुलाने केला. आजार नसणार्‍या नागरिकांना आजार लावून त्याची चिता पेटविण्याचे काम हे हायटेक आरोग्य कर्मचारी करीत असल्याची भावना मनमाडमध्ये या प्रकारानंतर व्यक्त केली जात आहे. या प्रकारा बाबत शहरातील सर्वच राजकीय पक्ष आंदोलनाच्या पाविञ्यात असून या घटनेनंतर शिवसेना भाजपा पदाधिकार्यांनी या रुग्णालयात डॉक्टरना धारेवर धरत रुग्णालय बंद पाडण्याचा इशारा दिला या प्रसंगी मनमाड नगरपालिकेचे आरोग्य सभापती लियाकत शेख ,भाजपाचे चिटणीस नारायण पवार ,एकनाथ बोडके ,जितु शिंदे ,तसेच पंडित सानप ,नईम शेख आदि उपस्थित होते.