Breaking News

ओबीसीच्या बळावर लोकसभा, विधानसभेच्या सर्व जागा लढवू - सुरेश साखरे


सोलापूर, दि. 20, फेब्रुवारी - आमच्याकडून काही चुका झाल्या मान्य आहे. मात्र येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ओबीसींच्या बळावर महाराष्ट्रातील सर्व जागा लढ विण्यात येतील, अशी माहिती बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी दिली. भाजपने केंद्रात आणि राज्यात जनतेची दिशाभूल केली. विकासाची आमिषे दाखवून मते मिळवली आणि दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. विकास तर केला नाहीच त्याशिवाय नोटाबंदी आणि जीएसटी आणून मोठमोठ्या उद्योगजकांसह सर्वसामान्यांची पिळवणूक केली. शेतकरी आत्महत्या तर रोखू शकलेच नाही. मात्र मंत्रालयात आत्महत्या सुरू झाल्या. भाजप पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे मत साखरे यांनी व्यक्त केले. कॉॅँग्रेस असो किंवा भाजप हे निवडणुकीपूर्वी विदर्भाची भाषा बोलतात. नंतर मात्र तोंडावर बोट असते. बहुजन समाज पक्षाची सत्ता आल्यास मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण असे लहान लहान राज्ये करू. नवीन राज्य केल्यास निश्‍चित विकास होईल.