पालिका हद्दीतील शेतकऱ्यांना न्याय द्या: रमेश गोरे
सादर केलेल्या निवेदनात कशाप्रकारे सरकारच्या विविध योजनांपासून शहरी भागातील शेतकरी वंचीत राहात आहेत. याचा सविस्तर खुलासा गोरे यांनी केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वैयक्तिक लाभांच्या योजना, साठवण बंधारे, पाणलोटक्षेत्र विकास आदी योजनांतर्गत अनुदान मिळते. परंतु महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपालिका व नगर पंचायतींच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना अशा कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. एकीकडे नागरी जनजीवन सुसह्य होण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असताना, या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र कसल्याही योजना उपलब्ध होत नसल्याने अशा शेतकऱ्यांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे.
