Breaking News

वीज कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू


अमरावती जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले आहे. गारपीट व पाऊस सुरू असल्याने आपल्या शेतात हरभराची गंजी झाकण्यासाठी गेलेल्या एका शेतकर्‍याचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नायगाव शेत शिवारात रविवारी दुपारी ही घडली घडली. गंगाधर आत्माराम कोकाटे (वय 68 वर्ष रा.नायगाव ता.दर्यापूर) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.