Breaking News

भारिपचा 26 फेब्रुवारीला दिल्लीत मोर्चा


ठाणे : मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक करावी, 3 जानेवारीच्या बंद दरम्यान ज्या आंबेडकरी तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी भारिप- बहुजन महासंघाच्या वतीने 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीत मोर्चा नेण्याचे जाहीर केले आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने ठाण्यात झालेल्या बैठकीमध्ये 500 जण दिल्लीतील मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रकाश डबरासे आणि ठाणे शहर अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ठाणे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये मोर्चामागील भूमिका स्पष्ट करण्यात आली.