Breaking News

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजू शेट्टी


धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी पुनर्वसन अधिकारी जबाबदार असून त्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. धर्मा पाटील यांना मी भेटलो होतो. त्यांच्या शेजारी 74 गुंठे जमीन असलेल्या शेतकर्‍याने एजंट मध्यस्थी करून पावणे दोन कोटी रूपये भरपाई घेतली. धर्मा पाटील यांनी एजंट माध्यमातून प्रयत्न केले नाही म्हणून 4 लाख त्यांच्या पदरात पडले. ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे, असेही मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.