Breaking News

‘संजीवनी’च्या निकालाची परंपरा कायम


कोपरगांव / प्रतिनीधी  :- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबईच्यावतीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या पदविका अभियांत्रिकी शाखांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या पाचव्या सत्राच्या सर्व शाखांचा सरासरी  निकाल ९० टक्के लागला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाची निकीता दगडू आगलावे हिने ९२. ५९ टक्के गुण मिळवुन सर्व शाखांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला. इलेक्ट्राॅनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील ऋषिकेश दवंगे याने ९० टक्के गुण मिळविले. संजीवनीने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे, अशी माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी दिली. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अभिनंदन केले.