श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी : -नगरपालिकेकडून गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्यास टाळाटाळ होत आहे. तालुक्यात धनगर समाजाची संख्या मोठी आहे. शहरात अनेक दिवसांपासून पालिकेने केवळ पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी चबुतरा तयार करून ठेवला आहे. परंतु याठिकाणी अद्यापपर्यंत हा पुतळा बसविण्यात आला नाही. यासंदर्भात पालिकेला अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मोर्चे काढण्यात आले. परंतु आजपर्यंत केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे धनगर समाजाचा अंत पाहू नका, पुतळा बसवा, अशी मागणी धनगर समाज बांधवांमधून केली जात आहे.
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीआधी नगराध्यक्षा आदिक यांना धनगर समाज संघर्ष समितीने निवेदन देण्यात आले होते. लवकरात लवकर पुतळा बसवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. येत्या आठ दिवसांत मुख्याधिकाऱ्यानी पुतळ्यासंदर्भात योग्य माहिती न दिल्यास धनगर समाज संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खेमणर यांनी दिला. यावेळी जिल्हा सरचिटणीस मनोज भिसे, दत्तात्रय हळनोर, बबनराव कांदळकर, चेतन शिंदे, गणेश भिसे, डॉ. रविंद्र काबुडके, राहुल पांढरे, जालिंदर रोडे, बापू राशीनकर आदी उपस्थित होते.
धनगर समाज संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडणार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:45
Rating: 5