या राज्यात गेली साडेतीन वर्ष बिनपैशाचा आपण तमाशा पहात आलो असून एकजुटीची तयार केलेली ही वज्रमुठ सरकारच्या माथ्यावर मारण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी हिंगोली वासियांना केले. आज हल्लाबोल आंदोलनाचा सातवा दिवस असून येथे आयोजित सभेत ते बोलत होते. आज माझ्या शेतकर्यावर अविश्वास दाखवण्याची, त्याला अपमानित करण्याची गरज काय असा सवाल करतानाच अशा खोटारडया सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. त्याला हिंगोलीवासियांनो साथ दया आणि 2019 मध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली येणार्या सरकारच्या यशाचे भागीदार व्हा, असेही सुनिल तटकरे म्हणाले.
साडेतीन वर्ष बिनपैशाचा तमाशा : तटकरे
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:11
Rating: 5