Breaking News

रथयात्रेचे 21 जानेवारीला नगरमध्ये आगमण


अहमदनगर :- अखिल विश्‍व गायत्री परिवार, शांतीकुंज (हरिद्वार ) आयोजित कन्याकुमारी ते नागपुर या रथयात्रेचे आगमन अहमदनगर शहरामध्ये येत्या गणेश चतुर्थी दि. 21 जानेवारी 2018 रोजी होत असून या निमित्ताने रथयात्रेची मिरवणूक आणि चित्रफितीद्वारे प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, दि. 21 रोजी दु. 1 वा. माळीवाडा वेशीजवळ या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून दु. 3 वा. रथयात्रेची मिरवणूक निघणार आहे, ही मिरवणूक माळीवाडा, पंचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड, लक्ष्मीकारंजा, गांधी मैदान, असा मिरवणुक मार्ग असणार आहे.