Breaking News

गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास १० दिवसांच्या आत कर्जमाफी


काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास स्थानिक शेतकऱ्यांना १० दिवसांच्या आत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. 'गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आले तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी पहिल्या १० दिवसांत एक निश्चित धोरण तयार केले जाईल', असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पाच-दहा उद्योगपती मित्रांचे सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली तेव्हा त्यांनी आपले हात वर केले. आपल्या सरकारचे असे कोणतेही धोरण नसल्याचे त्यांनी याविषयी नमूद केले,


 राहुल गांधी गुरुवारी पाटीदारबहुल अमरेली जिल्ह्यातील लाठी येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना म्हणाले. मोदी मागील २२ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलत आहेत. मात्र, करत काहीच नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या, त्यांचे पाणी उद्योगपतींना दिले. त्यांना त्यांचा पीकविमाही दिला नाही. मात्र, राज्यात आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी पहिल्या १० दिवसांत एक निश्चित धोरण तयार केले जाईल.