भंडारदरा परिसराचा चेहरामोहरा बदलून पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या पटलावर आणू.
अहमदनगर : भंडारदार परिसर निसर्गरम्य असून येथील पर्यटन विकास अजूनही झाला नाही अशी खंत व्यक्त करतानाच तो अधिक प्रमाणात होऊन येथील आदिवासी तरुणांच्या महिलांच्या हाताला काम कसे मिळेल यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करून येथील निसर्गाचे संवर्धन करताणाचं शिक्षण आरोग्य याबरोबरच कौशल्य विकास योजनेतून रोजगार निर्मिती करण्याचा आपला उद्देश असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या भंडारदरा परिसराचा चेहरा मोहरा बदलून हे पर्यटन स्थळ जगाच्या पटलावर आणू त्यासाठी स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक यांनी योगदान देऊन आदिवासी भागाचा विकासासाठी मदत करावी तर डॉ. एपीजी अब्दुल कलाम यांच्या बडे सपने देखो या उक्तीप्रमाणे विध्यार्थ्यानी दृष्टी, स्वप्न मोठे ठेवून आयपीएस, शास्त्र, जिल्हाधिकारी व्हावेच मात्र उत्कृष्ट शेती करून शेती उद्योजकही व्हावे असे आव्हान त्यांनी करतंच विद्यार्थ्यांशी सवांद साधून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविला.
भंडारदरा परिसर निसर्गरम्य असून येथील आदिवासी धरणासाठी प्रकल्पासाठी विस्थापित झाले आहे. त्याच्या रोजी रोटीसाठी पर्यटनविकास व्हावा हीच अपेक्षा वाल्मिक केंद्रे यांची असून त्यांनी तसे प्रयत्न करताना या परिसरातील आदिवासी खेडे लव्हाळवाडी दत्तक घेतले असून येथील आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे त्यांना या भागातील माणसे मदतच करतील असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी दिले.
भंडारदरा परिसरातील चिचोंडी या ठिकाणी वाल्मिक केंद्रे या उद्योजकाने बालमहोत्सव आयोजन व हेलिकॅप्टर निसर्ग फेरफटका कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी भारत सरकारचे कौशल्य विकासाचे संचालक बाळासाहेब दराडे, युवा उद्योजक गणेश माने, भाजपचे नाशिक शहर उपाध्यक्ष सुनील केदार, भारत दर्शनाचे प्रवक्ते नारायण फड, इतिहासकार संदीप तापकीर, उद्योजक सोमनाथ फुंदे, समीर थोरवे, जमीर मुलाणी, योगेश काळजे, आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, शिवसेनेचे सतीश भांगरे, युवा उद्योजक अमित भांगरे, संतोष मृतड्क, कैलास शहा, सरपंच दिलीप भांगरे, सुरेश गभाले उपस्थित होते. प्रास्तविक व स्वागत उद्योजक वाल्मिकी केंद्रे यांनी केले.
प्रसंगी बोलताना नासा संस्थेचे संशोधक, भारत सरकारचे कौशल्य विकास आधारित योजनेचे संचालक बाळासाहेब दराडे यांनी तर उद्योजक गणेश माने म्हणाले की, केंद्रे यांनी मोठे धाडस दाखवून आदिवासी बाहुल्यात त्यांनी उद्योग उभारला असून या भागातील जनतेने त्यासाठी मदत करावी. त्यांच्या कामात आडकाठी करणार्यांवर मात करून या आदिवासी भागातील रोजगार वाढवावा, इतिहासकार अकोले तालुका समृद्ध असून 12 गडकिल्ले आहे. येथील पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.
यावेळी भाजपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुनील केदार, डॉ. किरण लहामटे यांचेही भाषणे झाली.
वाल्मिकी केंद्रे यांनी आदिवासी भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून येथे शेती पूरक योजना आणून महिलांच्या हाताला काम देऊन महिला सबलीकरण करणार आहोत तर लव्हाळवाडी हे आदिवासी गाव दत्तक घेऊन तेथील सर्वांगीण प्रश्न सोडवू सुत्रसंचलन व आभार नारायण फड यांनी मानले.
चिचोंडी येथील रेनबो प्रकल्पाचे उदघाटन ठकाबाबा गांगड व मान्यवरांच्या हस्ते झाले. तर हेलिकॅप्टर सेवा सुरु करण्यासाठी प्रथम 87 वर्षाचे ठकाबाबा व चिचोंडी गावचे बालचमू ज्ञानेश्वर वायाळ, मुस्कान मणियार, वैशाली मधे यांना प्रथम हेलिकॅप्टर मध्ये बसवून भंडारदरा परिसराचा फेरफटका मारून अधिकृत उदघाटन केले. त्यामुळे उपस्थितांनी या घटनेला दाद देऊन समाधान व्यक्त केले.
भंडारदरा परिसर निसर्गरम्य असून येथील आदिवासी धरणासाठी प्रकल्पासाठी विस्थापित झाले आहे. त्याच्या रोजी रोटीसाठी पर्यटनविकास व्हावा हीच अपेक्षा वाल्मिक केंद्रे यांची असून त्यांनी तसे प्रयत्न करताना या परिसरातील आदिवासी खेडे लव्हाळवाडी दत्तक घेतले असून येथील आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे त्यांना या भागातील माणसे मदतच करतील असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी दिले.
भंडारदरा परिसरातील चिचोंडी या ठिकाणी वाल्मिक केंद्रे या उद्योजकाने बालमहोत्सव आयोजन व हेलिकॅप्टर निसर्ग फेरफटका कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी भारत सरकारचे कौशल्य विकासाचे संचालक बाळासाहेब दराडे, युवा उद्योजक गणेश माने, भाजपचे नाशिक शहर उपाध्यक्ष सुनील केदार, भारत दर्शनाचे प्रवक्ते नारायण फड, इतिहासकार संदीप तापकीर, उद्योजक सोमनाथ फुंदे, समीर थोरवे, जमीर मुलाणी, योगेश काळजे, आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, शिवसेनेचे सतीश भांगरे, युवा उद्योजक अमित भांगरे, संतोष मृतड्क, कैलास शहा, सरपंच दिलीप भांगरे, सुरेश गभाले उपस्थित होते. प्रास्तविक व स्वागत उद्योजक वाल्मिकी केंद्रे यांनी केले.
प्रसंगी बोलताना नासा संस्थेचे संशोधक, भारत सरकारचे कौशल्य विकास आधारित योजनेचे संचालक बाळासाहेब दराडे यांनी तर उद्योजक गणेश माने म्हणाले की, केंद्रे यांनी मोठे धाडस दाखवून आदिवासी बाहुल्यात त्यांनी उद्योग उभारला असून या भागातील जनतेने त्यासाठी मदत करावी. त्यांच्या कामात आडकाठी करणार्यांवर मात करून या आदिवासी भागातील रोजगार वाढवावा, इतिहासकार अकोले तालुका समृद्ध असून 12 गडकिल्ले आहे. येथील पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.
यावेळी भाजपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुनील केदार, डॉ. किरण लहामटे यांचेही भाषणे झाली.
वाल्मिकी केंद्रे यांनी आदिवासी भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून येथे शेती पूरक योजना आणून महिलांच्या हाताला काम देऊन महिला सबलीकरण करणार आहोत तर लव्हाळवाडी हे आदिवासी गाव दत्तक घेऊन तेथील सर्वांगीण प्रश्न सोडवू सुत्रसंचलन व आभार नारायण फड यांनी मानले.
चिचोंडी येथील रेनबो प्रकल्पाचे उदघाटन ठकाबाबा गांगड व मान्यवरांच्या हस्ते झाले. तर हेलिकॅप्टर सेवा सुरु करण्यासाठी प्रथम 87 वर्षाचे ठकाबाबा व चिचोंडी गावचे बालचमू ज्ञानेश्वर वायाळ, मुस्कान मणियार, वैशाली मधे यांना प्रथम हेलिकॅप्टर मध्ये बसवून भंडारदरा परिसराचा फेरफटका मारून अधिकृत उदघाटन केले. त्यामुळे उपस्थितांनी या घटनेला दाद देऊन समाधान व्यक्त केले.
